नंदुरबार : शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी, त्यांनी एका कार्यक्रमात, मंचावर उपस्थित भाजपच्या नेत्यांकडे पाहून त्यांचा, ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यांनतर त्यांच्या विधानावर अधिक बोलताना, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील काही वक्तव्ये करून धुरळा उडवून दिला.
दिवाळीपूर्वीच देशमुख तुरुंगात जाणार, मग नंबर…सोमय्यांचा नवा दावा
दरम्यान, शुक्रवारच्या सगळ्या राजकीय धुराळ्यानंतर आज नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच गाडीतून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या व्यक्तव्यानंतर आजच फडणवीस-पाटील एकाच गाडीतून आल्याने पुन्हा एकदा राजकीय तर्कविर्तकांना उधाण आले आहे.
कर नाही त्याला डर कशाला, आरोपाला सामोरे जा!
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी .के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. यासाठी ठाकरे सरकारमधील तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते आणि विरोधी भाजपचे नेते एकाच मंचावर असणार आहेत. यामध्ये फडणवीस आणि पाटील यांच्यसह मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे राजकीय नेते उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल आणि राज्यात नवीन सरकार येईल!
दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर शनिवारी पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, ‘कुणी तरी आहे तिथे, त्यांना यायचे आहे आमच्याकडे, असाच मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. ठाकरेंची स्वत:ची शैली आहे. त्यातच ते बोलले. त्यांनी सरकार पडेल किंवा आम्ही सरकारमधून बाहेर पडू असे म्हटले नाही. ते स्पष्ट म्हणाले, ज्यांना भावी सहकारी व्हायचे आहे, जे आमच्याकडे येऊ इच्छितात. त्यांना उद्देशून त्यांनी विधान केले,’ असं म्हणत पुन्हा एकदा धुरळा उडवून दिला आहे.
Read Also :