मुंबई: मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. असे असताना शिवसेना पक्षाने आता पासूनच घटकपक्षांना आणि विरोधकांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबले आहे. यामुळे विरोधात असणारा भारतीय जनता पक्ष आतापासूनच बॅकफूटवर गेल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
हे पण वाचा सत्ता संघर्ष भाग ४: कोल्हापुरात पुन्हा एकदा बंटी पाटील विरुद्ध मुन्ना महाडिक संघर्ष बघायला मिळणार
मुंबई महापालिकेतील प्रभागरचनेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत वाद सुरु आहेत. राज्य सरकारने प्रभागरचनेबाबत निर्णय घेऊन आता भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास मंत्रिमडळाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य नगरसेवकांची संख्या २३६ होणार आहे.
हे पण वाचा दाऊदशी संबंध असलेला रियाझ भाटी फडणवीसांसोबत जेवण कसा घ्यायचा? – नवाब मलिक
या निर्णयाबाबद्दल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २३७ इतकी आहे. ही संख्या सन २००१च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार निश्चित केलेली आहे. २०११ सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्केवाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधीत्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
या निर्णयावर भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी फक्त ९ नगरसेवक का वाढले, असा सवाल विचारला आहे. यासाठी लोकसंख्येचा की जनगणनेचा आधार आहे ? केवळ राजकीय सोयीसाठी तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नगरसेवकांची संख्या वाढवण्या आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय या पूर्वीच घेता आला असता. या आधी इतर महापालिकांमध्ये १५ टक्के जागा वाढविण्यात आल्या होत्या. तेव्हाच मुंबईच्या जागा का नाही वाढवल्या, असे प्रश्न त्यांनी विचारले. प्रभागरचनेत गडबड करून आपण निवडणूक जिंकू का, असा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.