मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याने आम्ही १३ खासदार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. पुर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. पण, आता आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक झालो आहोत. आम्ही एनडीएचा घटक झाल्याने आमची कामे झाली पाहिजेत. घटकपक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे. पण भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. सापत्न वागणूक आम्हाला मिळते असं गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”
भाजप अजगर, मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपाने खाऊन टाकले. भाजपने मूळ स्वभाव आणि भूमिका सोडली नाही. गजानन किर्तीकरांसारखा आमचे जुने सहकारी तिथे जाऊनसुद्धा सुखी आनंदी नाहीत. याचा अर्थ भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे. त्यातील एक एक कोंबडी कापायला सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती हे त्यांना कळेल. असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा, त्याला नसबंदी…” सजंय शिरसाठ यांचा राऊतांना टोला
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गजानन किर्तीकर सोडून जाणे हे आमच्यासाठी वेदनादायी होती. पण आज ते भाजप आम्हाला लाथा घालतायेत, नीट वागवत नाही, असं सांगतात, मग आम्ही काय वेगळे सांगत होतो. भाजप शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देत आहे. म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली. फुटलेल्या गटात अस्वस्थता आणि नाराजी आहे. झालेल्या गटातच २ गट पडले आहेत. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तयारीला लागा…! “पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…“संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील,” भाजप आमदाराची राऊतांवर जहरी टिका
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन
हेही वाचा…“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला,
हेही वाचा…शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार ? अपात्रतेच्या कारवाईला वेगाने हालचाली