नांदेड : शेतकरी आंदोलन, कोरोना काळातील भूमिका, महागाई रोखण्यात अपयश आल्यामुळे भाजपतर्फे जनतेमध्ये दृष्टिभ्रम निर्माण करण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन घोटाळे बाहेर काढण्याचा आविर्भाव केला जात असल्याची टीका शिवसेनेच्या उपनेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानसभेच्या देगलूर – बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारासाठी त्या मंगळवारी (ता.२६) येथे आल्या होत्या.
देवाकडून बंद होणारा ऑक्सिजन पुरवठा मीच सुरू केला, असंही उदयनराजे म्हणतील – शिवेंद्रराजेंचा घणाघात
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, २०१४ मध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. २०१९ मध्ये युती झाली. परंतु, त्यांनी शिवसेनेला दिलेला शब्द न पाळल्याने युती फिसकटली. देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचे काम महाराष्ट्राने करून महाविकास आघाडी निर्माण केली. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे भाजपतर्फे वारंवार सांगितले जात आहे. परंतु, त्यांना त्यात यश आले नाही. आता भाजपने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. तो कितपत यशस्वी होईल, हे सांगता येत नाही. कोरोनाकाळात महाविकास आघाडी सरकारने अनेक उपक्रम राबविले. एकंदरीतच डावपेच न करणारे हे सरकार असून, भाजपने कितीही घोटाळे बाहेर काढले तरी, त्यांचे सत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकारने औकातीत राहावं, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; भाजप आमदाराने भरला दम
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, भाजपची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे. भाजप आपल्या खिशात आगपेटी घेऊन फिरत आहे. इतरांच्या घरात आग लावणे, आग लावता आली नाही तर आरोप करीत सुटणे, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणे, हा भाजपचा उद्योग झाला आहे.
Read Also :
- समीर वानखेडेच्या जातीचा दाखला खोटा ठरल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार – नवाब मलिक
- मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसाना जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी ठाकरे सरकारकडून क्लीन चीट
- समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाबाबत नवाब मलिकांचा अजून एक गौप्यस्फोट; म्हणाले…
- विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू; महाविकास आघाडीला आमदार फुटण्याची भीती!
- तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं योग्य नाही; आरोप लागले आहेत तर चौकशी करा – देवेंद्र फडणवीस