पुणे – भाजपा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात राजकारण करत आहे. त्यांचं हे कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे.” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्याच्या बोपोडीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल. तेव्हा, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल अस त्यांनी यावेळी सांगितलं.
पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी; दोन्ही गट आमने-सामने
तसेच, या वेळी नाना पटोले यांनी, “भाजपा राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकरण करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या दिवशीपासून पहाटेचे सरकार पडले तेव्हापासून मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन ही भूमिका घेऊन सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा देखील साधला.
ते पुढे म्हणाले की, “राज्यात अस्थिरता कशी निर्माण केली जाईल आणि राज्याचा विकास होणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकारण केल जात आहे. ते कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे.”
राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, परंतू निर्बंध अजून कडक करणार – राजेश टोपे
याचबरोबर, “विधानसभा अध्यक्षांचा पेच लवकरच सुटेल. नऊ महिने झालं करोनाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अधिवेशन होऊ शकलं नाही. पाच दिवसांच अधिवेशन पार पडलं. मात्र अध्यक्षांच्या निवडीबाबत संविधानिक आणि तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळं ती निवड पुढं ढकलण्यात आली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल. तेव्हा, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. तसं नियोजन झालं आहे.” अस पटोले म्हणाले आहेत.
Read also:
- पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- “एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
- “ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मी मंत्रिपदाचा त्याग करणार”
- नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
- कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत