नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मालेगावात विराट सभा पार पडली. या सभेत शिवसैनिकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. नेहमी प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर कडाडून प्रहार केला. भाजप म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष असून भाजपातील काही स्वच्छ माणसं हे कसन करत असतात ? असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…“राज्यात बाळासाहेबांच्या खुप सभा व्हायच्या, परतुं…” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
भाजपचे सरकार देशात ९ वर्षापासून आहे. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री होते. एकतरी भ्रष्टाचाराचा आरोप आहे. भ्रष्टाचाराच्या बाजूला तुम्ही बसला आहात. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता हे मिळवणारे तुम्ही आहात. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचा धर्मच आहे.सत्तेपासून पैसा मिळवायचा. त्यांच्या मांडीवर जावून तुम्ही बसले आहात. भ्रष्टाचाराची भाषा बोलणं तुम्हाला शोभत नाही. अशी टिकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा…“बेगडी अन् दुटप्पी हिंदूत्व पांघरून, तुम्ही जास्त दिवस जनतेला मूर्ख बनवू शकत नाही, जनाब उद्धव ठाकरे”
उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील भाष्य केलं. काल राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पाहिली. हिडनबर्गने घोटाळे काढले पण त्याकडे लक्ष नाही. राहुल गांधींना जाहीर सांगतो सावरकर आमचे दैवत असून त्यांचा अपमान आम्हाला पटणार नाही. सावरकर काय होते हे आपण वाचू शकतो. अष्टभुजेसमोर शपथ घेणारे सावरकर होते. १५ व्या वर्षी ही सावरकरांची शपथ होती. सावरकरांनी जे केले ते कोणाचेही काम नाही. १४ वर्ष छळ सोसला ते बलिदानच आहे. म्हणून राहुल गांधींना सांगतोय आपण लोकशाही वाचवायला आलोय. आता जर वेळ चुकली तर मग पुढे कठीण आहे. पुन्हा जर हे तिथे बसले की मग लोकशाही संपली. ही लढाई मी मुख्यमंत्री होण्याची नाही. लोकशाही वाचवण्याची आहे. भाजपमधील सावरकर भक्त आहात तर अंध भक्त होऊ नका. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“सभागृहात मोदींची गोची होतेय, म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द केली”
दरम्यान, मी मालेगावकरांना धन्यवाद देतो. कोरोनाच्या संकटात दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. मुंबई आणि मालेगावच करायचं काय ? बंदोबस्ताला आलेले पोलीसही कोरोनाग्रस्त होत होते. मी सर्व धर्मगुरूंशी बोललो आणि तुम्ही साथ दिली नसती तर मालेगाव वाचलं नसते. पण मी, घरी बसून तुमच्याशी बोललो आणि तुम्ही ऐकले, कुटुंबाचा सदस्य म्हणून मला मान दिला हे गद्दारांच्या नशिबात असेल का ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Read also
- हेही वाचा…“राष्ट्रवादीची बॅनरबाजी ही एकप्रकारची मुर्खता”, बच्चू कडूंची जहरी टिका
- हेही वाचा…“तर अजित पवार यांनी माझ्या कामठी मतदारसंघात निवडणुक लढायला यावं”, बावनकुळेंचं आवाहन
- हेही वाचा…“शरद पवारांनी 2024 मध्ये एनडीएमध्ये यावं, ” केंद्रीय मंत्र्यांची शरद पवारांना खुली ऑफर
- हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना बोलण्यापुर्वी ज्या बेईमानांना मांडीवर घेऊन बसलेले आहात, त्या जनाबांना आधी सांभाळा”
- हेही वाचा…“राष्ट्रवादीचा मेगा प्लॅन..!, राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा अभियान सुरू”