मुंबई : शिवसेना संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली असून, देशातील सध्याच्या महामारीच्या परिस्थितीवरून, “या देशात केंद्र सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण त्यांचं अस्तित्व जाणवणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. देशात ज्याप्रकारे मृत्यू होत आहेत. गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह सापडत आहेत, यावरून देशात हाहाकार माजला आहे, ते पाहता देश रामभरोसे आहे,” असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे.
दरम्यान, त्यांच्या या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले असून, “हा देश रामभरोसे चालत आहे? राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या ठाकरे सरकारला असे आडून टोमणे मारणे, त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले, तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे’, असा घणाघात त्यांनी केला आहे.
त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा…
देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कस विसरून चालेल?
या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 14, 2021
तसेच, “राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?”, असा हल्लबोल त्यांनी राऊत यांच्यावर केला आहे.
Read Also :
- मराठा आरक्षण.! केंद्राच्या फेरविचार याचिकेत राज्याने सहभागी व्हावे – आमदार महेश लांडगे
- एक प्रेम कथा लवकरच! करुणा धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट व्हायरल
- ‘आता कुंभमेळ्यावर बोलणारे बोलभांड आता कुठे आहेत?’
- महाविकास आघाडीत वाद ? मुख्यमंत्री ठाकरेंची पवारांकडे नाराजी
- ‘मराठा समाजाचं आंदोलन होऊ नये म्हणून लॉकडाऊन वाढवला’