कोरोनाचे संकट आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे देशात असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोणताही धोका नको म्हणून शाळा, महाविद्याल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द केल्या. मात्र कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापीठांत दिसून आला
या प्रकारानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की लगेच सरकारच्या अंगाला सुया टोचतात. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही एवढे दिवस हेच सांगत होतो. ‘ढ’ कारभार सगळा, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी सरकारला लगावला.
दरम्यान या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्टीकरण दिले. कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, असे सांगत दादा भुसे यांनी विद्यार्थी आणि पालकांना आश्वस्त केले.
राज्यात राज्यात कृषी महाविद्यालयाचे २८००० विद्यार्थी आहेत. अमरावतीतील एका कृषी विद्यालयाने २४७ विद्यार्थींना कोविड १९ चा शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले आहे. ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासनही भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.