मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाचा वेग देखील मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहेत. कोरोनामुळं भारतात झालेल्या मृत्यूचा समोर आलेला आकडा हा खोटा असल्याचा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधींच्या या टीकेनंतर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधींची सत्तेवाचून तडफड सुरू आहे. आधी महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा, अशा शब्दात भातखळकर यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
राफेल राफेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला,जनतेने अमेठीतून विकेट काढली.आता कोरोनावर स्वार होऊन सत्तेची स्वप्न बघतायत.सत्तेवाचून तडफड सुरू आहे.
कितीही चिखल उडवला तरी देश मोदींच्या मागे खम्बीर उभा आहे, तुम्ही
महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा.@RahulGandhi— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 28, 2021
अतुल भातखळकर म्हणाले की, राफेल राफेल करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, जनतेने अमेठीतून विकेट काढली. आता कोरोनावर स्वार होऊन सत्तेची स्वप्न बघतायत.सत्तेवाचून तडफड सुरू आहे. कितीही चिखल उडवला तरी देश मोदींच्या मागे खंबीर उभा आहे, तुम्ही महाराष्ट्राला रसातळाला नेणारा तीनचाकी खटारा तर सांभाळा, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी आल्याचा आरोप करत राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान नियोजनाचा विचारच करत नाहीत. त्यामुळं लसीकरणासाठीही कोणतेही नियोजन केलं नाही. ते इव्हेंट मॅनेजर आहेत आणि एका वेळी ते एकाच इव्हेंटचा विचार करतात, अशी टीका त्यांनी केली.
Read Also :