पुणे : मुंबईत पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर देखील झाला. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली होती. यावरून मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठत आहे. आता मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
गेल्या 20 वर्षां जास्त काळापेक्षा मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात देखील ते सत्तेत आहे. तसेच 40 हजारांचे त्यांचं बजेट असते. 58000 कोटींच्या ठेवी आहे . पण तरीदेखील मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुंबईत म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला, राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. ब्रिटिशांनीच सगळं केलं. मग शिवसेनेनं मुंबईत काय केलं?, असा सवाल त्यांनी विचारला.
आधी काँग्रेसची सत्ता होती. त्यांनीही काही केलं नाही. त्या महापालिकेत मुंबईकर शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो शिकवतील, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटलांनी सत्ताधारी शिवसेनेवर केली.
Read Also :
- रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला, म्हणाले…
- ‘राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव’
- Video : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात साकारले 53 फूट उंचीचे भित्ती चित्र
- प्राधिकरणाचा उद्देश साध्य झालेला नाही; भाजपच्या राम-लक्ष्मणाची जोडी कोर्टात जाणार
- ‘मालाडमधील घटनेत 11 लोकांचा मृत्यू ही शिवसेना शासित BMC कडून योजनाबद्ध हत्या’