मुंबई : पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्याने लोकलवसेवा बंद करण्यात आली होती. सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. यावरून आता भाजपकडून मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ‘मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पावसाच्या येता सरी…
मुंबई पाण्याने भरी…
मुख्यमंत्री बसले घरी…
मुंबईची जनता विचारी…
‘ही' कुणाची जबाबदारी ???#MumbaiRains
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 9, 2021
पावसाच्या येता सरी…मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी…मुंबईची जनता विचारी…‘ही’ कुणाची जबाबदारी ?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत विचारला आहे.
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील राज्य सरकारवर यावरून निशाणा साधला. मनपा किंवा राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारीसुद्धा मोदींवर ढकलतील आणि मोदींनीच यातून मार्ग काढावा म्हणतील. एवढं तरी म्हणू नये हीच आमची अपेक्षा आहे, असा जोरजार टोला भातखळकरांनी लगावला आहे.
Read Also :
- 2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला हवा का? जयंत पाटील म्हणाले…
- ‘शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार’
- फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली होती लस, RTI मधून स्पष्ट
- ‘अजित पवारांना गजनी झाला आहे का?’
- भाजप नेत्यांची बैठक म्हणजे चार तासांचा ‘कुटाणा’, अमोल मिटकरींची टीका