मुंबई : यंदा देखील आषाढी वारी पालखी सोहळ्यावर कोरोना व्हायरस महामारीचे संकट आहे. या संकटामुळे मानाच्या दहा पालख्यांनाच आषाढी वारी सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र यावर आता भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.
वारीची परंपरा मोडीत काढणाऱ्यांनी टक्केवारीची परंपरा जोरात चालविली. महाआरती करणारे आता महावसुली करतात, आणि शिवरायांचे नाव घेणारे ख्वाजा गरीब नवाजचा आग्रह धरतात .
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 15, 2021
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी यावून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘वारीची परंपरा मोडीत काढणाऱ्यांनी टक्केवारीची परंपरा जोरात चालविली. महाआरती करणारे आता महावसुली करतात, आणि शिवरायांचे नाव घेणारे ख्वाजा गरीब नवाजचा आग्रह धरतात’, असे ट्विट करत उपाध्ये यांनी सरकारला टोला लगावला आहे.
संपली वारी…
आता ऊरली फक्त टक्केवारी !#महाभकास आघाडी https://t.co/TspQh8eMSy— Meghna Sakore Bordikar (@MeghnaBordikar) June 15, 2021
भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी देखील वारीसाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांवर सरकारवर टीका केली आहे. ‘संपली वारी…आता उरली फक्त टक्केवारी. महाभकास आघाडी, असे ट्विट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असं आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केलं आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे 1.5 किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Read Also :