मुंबई : न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या निकालाला स्थगिती दिल्यानंतर, सत्तेतील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यात आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. या पार्श्वभूमीवर आता संसदेत काल घटनादुरुस्ती विधयेक सादर करण्यात आले आणि बहुतांश मतांनी ते मंजूरही करण्यात आले.
बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
दरम्यान, यावरून राज्यातील ठाकरे सरकारमधील नेत्यांनी नाराजी दर्शवत भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या टीकेला आता भाजपतील नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले असून, भाजप आमदार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “राज्य सरकारने स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाला अजूनही निधी आणि मनुष्यबळ दिलेलं नाही. ओबीसी आरक्षणावर हे सरकार फक्त वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे,” अशी टीका ठाकरे सरकारवर केली आहे.
संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, ही लोकशाहीला अशोभनीय घटना; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
त्यांनी आज मुंबईत, पत्रकारांशी संवाद साधला यावेळी, “ठाकरे सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात कोणतीही हालचाल करत नसून, २०२२ च्या जानेवारी-फेब्रुवारीत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत त्यांना हा विषय अधांतरी ठेवायचा आहे. कारण त्यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाही. मराठा आरक्षणाच्या वेळी राज्य सरकारने ४ महिन्यात इम्पिरिकल डेटा तयार करून दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला. पण हे सरकार दुटप्पी आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
“…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
यावेळी, दोन्ही आरक्षणावरून राज्य सरकार गंभीर नाही. हे सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. दोन्ही समाजाच्या आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत, त्यांना केंद्राची आणि राज्याची भूमिका माहिती आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ लोकांना मूर्ख बनवू शकत नाही,” असा घणाघात करत, “भाजपच्या जास्त जागा येऊ नयेत म्हणून निवडणूक पुढे ढकलल्या जात आहेत, पण तरी आमच्याच जागा अधिक निवडून येतील,” असा दावा त्यांनी केला.
Read Also :
- मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा; पत्नीनं केली तक्रार
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप
- बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांवर ट्विटरची कारवाई, आम्ही लढत राहू! काँग्रेसचा निर्धार
- भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी
- कोरोनाकाळात ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा, पंतप्रधांनच सगळ्या मृत्यूंना जबाबदार