मुंबई : आषाढीच्या वारीसाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते.
सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता! pic.twitter.com/sNkSL9c08C— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 12, 2021
मला असं वाटतं की कमी उपस्थितीची पायी वारी करता येणं हे शक्य होतं. थोडा सरकारने जर विचार केला असता. तर निश्चितपणे, कारण त्यांची जी मागणी होती की, केवळ ५० लोकांची आम्हाला परवानगी दिली जावी. यासोबत त्यांनी मार्गावरील सगळ्या गावांचे ठराव घेतले आहेत, की गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही. त्यामुळे इतकं शिस्तीत जर जे काम होतं. तर त्यांचा गंभीरतेने विचार सरकारने करायला हवा होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावर्षी देखील आषाढी वारी सोहळ्यावर कोरोना व्हायरस महामारीचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर फक्त मानाच्या 10 पालख्यांनाच त्या त्या गावातून बसने पंढरपूरला नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Read Also :
- ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, चंद्रकांत पाटलांनी मला शिकवू नये’
- ‘प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी’
- ‘…म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग आहे’, पेट्रोलियममंत्र्यांनी सांगितले कारण
- ‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत, पोलिसांना तपासाचे आदेश