मुंबई : राज्यात जेव्हा भाजपाचे सरकार होते, तेव्हा महाराष्ट्र राज्य हे गुजरातच्या दहा टक्टे समोर होते. महाराष्ट्र राज्य गुजरात पेक्षा दहा टक्क्यांनी समोर असताना सुद्धा विरोधी पक्ष तेव्हा तांडव करायचा. पंरतु, गुजरात हे दहा टक्क्यांनी समोर गेले असताना, कोणीही बोलायला तयार नाही. माध्यमांची सुद्धा यामध्ये महत्वाची भुमिका आहे.
जेव्हा आमचे सरकार होते, तेव्हा आमची खुप छाननी करायचे. पंरतु, आता पाच पट सुद्धा माध्यमे छाननी करत नाही. माध्यामांनी ठरवले हे सरकार चालवणे ही जबादारी आपलीच आहे. अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी लोकसत्ता दिलेल्या मुलाखतीत केली आहे.
पुढे म्हणाले की, आमच ठरले आहे, आम्ही सत्ते असो किंवा नसो आम्ही आमच्या अजेंड्यावरच काम करत असतोय. आमच्या अजेंड्यावर काम करत असताना सरकार पडलं तर हे आमच वाय प्रोडक्ट आहे. खरं तर आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि त्यांच फळ म्हणजे महाराष्ट्र राज्याला आम्ही गुजरातच्या समोर नेण्यात आम्हाला यश मिळाले. परंतु, जर पुन्हा मी मुख्यंमंत्री झालो तर यांच्याकडे कुठलाच प्रश्नच राहणार नाही. त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र झाले आहेत.
जेव्हा पासून आघाडी सरकार आले तेव्हा पासून तर माध्यांनी सुद्धा आपली भुमिका बदलेली दिसते. त्यांमुळे माध्यमे हे मत तयार करायचे काम करत असतेय परंतु, काही लोकांना असे वाटते की, आपण सरकार बनवतो आणि आपणच पाडतोय, असे ही बोलताना म्हणाले.
Read Also :
- ‘राऊतांच्या धमक्यांना घाबरलो, मला आता पोलीस संरक्षण द्यावे लागेल’
- पुणे उद्यापासून ‘अनलॉक’, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?
- ‘मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल, भाजप मागणार नाही’
- ‘नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही?’
- ‘ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी’