पंढरपूर: ओबीसी आरक्षण आणि पद्दोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यात आल्याने भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे. तसेच, काँग्रेस नेत्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. पंढरपुरात घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पडळकर बोलत होते.
ओबीसींवर नेहमी अन्याय होतो. महाविकास आघाडीकडून ओबीसींना सापत्न वागणूक दिली जात आहे. या पक्षांनी मागासवर्गीय आयोगाचे देखील गठण केले नाही, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे जे नेते ओबीसी, एससी, एसटीच्या मतांवर राजकारण करत आहेत, ते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. काका-पुतण्यांसमोर मान हलवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच राहिलेला नाही, असा जोरदार टोला पडळकरांनी लगावला
सत्तेतला लाभ घ्यायचा आणि लाचार म्हणून राहायचे, अशी काँग्रेसची परिस्थिती आहे. पद्दोन्नतील आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांनी राजीनामा द्यावा. हे सरकार पूर्णपणे ओबीसींच्या विरोधातील असा आरोप पडळकरांनी केला आहे.
Read Also :
- ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
- ‘राम मंदिराच्या नावाने चंदा, हाच भाजप आणि आरएसएसचा धंदा’
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’
- ‘मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा’
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?