मुंबई – मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का दिला होता. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायतींच्या निवडणूक घेण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने त्यावेळी दिले होते.
डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा जो पर्यंत निकाली लागत नाही, तो पर्यंत कोणत्याही निवडणूका पार पडायला नको असा हा ठराव होता.
आयुक्त इकबाल सिंह, यशवंत जाधव यांच्या रूपात महापालिकेत सचिन वाझे; आमदार अमित साटमांचा आरोप
आता न्यायालयात १७ जानेवारी रोजी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आयोगाला अंतिम अहवाल मागितला होता. मात्र अद्यापही आयोगाचे काम सुरु झालेच नसून आता ते अहवाल कसा सादर करणार ? याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आगामी काळातील निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण राहणार नाही.
तुमच्या जीवावर ज्यांनी लालदिवा मिळवला आहे त्या ओबीसी मंत्र्यांना भेटेल तिथे गाठा आणि याबाबत जाब विचारा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर
गोपीचंद पडळकर यांनी आरोप केला आहे की मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ वाहवा मिळवण्यासाठी मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त साडे चार रुपये खर्च करण्याचे आदेश आयोगाला मिळाले आहेत. बाकीचे पैसे आलेलेच नाहीत.
ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापुरात तर आयोग पुण्यात अशी परिस्थिती सध्या आयोगाची आहे. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचे घावले आणि गाव सारे धावले, अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली, असा टोमणा त्यांनी मारला.
Read also:
- “चंद्रकांत पाटील हे काही राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू नाहीत, त्यांच्या बोलण्याने फरक पडत नाही”; संजय राऊतांचे पाटलांना चिमटे
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री