मुंबई : महाविकास आघाडीत सत्तेत असूनही अनेकदा काँग्रेस नेते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लोकांवर अन्याय होत असेल तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या जायला मागे पुढे पाहणार नाहीत, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले यांनी अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा मतदारसंघात सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीतरी मान ठेवा, असा टोला लगावण्यात आला आहे.
अन्याय झाल्यास मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जाऊ, अन्याय झाल्यास मंत्री यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना भिडतील, @NANA_PATOLE वक्तव्य, @AdvYashomatiINC यांनी केलेली मारहाण पटोलेच्या लक्षात आहे वाटत. काय भाषा? काहीतरी मुख्यमंत्र्याचा @OfficeofUT यांचा मान ठेवा pic.twitter.com/Ipq0ygvACP
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 13, 2021
भाजप नेते केशव उपाध्ये नाना पटोलेंचा व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, अन्याय झाल्यास मुख्यमंत्र्यांच्याही अंगावर जाऊ, अन्याय झाल्यास मंत्री यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना भिडतील, नाना पटोले यांचंवक्तव्य. यशोमती ठाकूरयांनी केलेली मारहाण पटोलेच्या लक्षात आहे वाटत. काय भाषा? काहीतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान ठेवा, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
दरम्यान, तुम्हाला मी विधानसभेत गेली अनेक वर्ष पहातोय. ह्या भागाच्या लोकांसाठी सातत्यानं भांडणारी रणरागिनी आम्ही पाहिली. वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जायला मागे पुढे पाहात नाही. जे लीड आपल्याला मिळालं, त्यापेक्षा जास्त मतानं आपला उमेदवार ह्या भागातून निवडून यायला पाहिजे, असे वक्तव्य पटोले यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य करताना केली. सोबतच, त्यांनी नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात निवडणुकाच निवडणूका असणार असल्याचे देखील म्हटले आहे.
Read Also :
- ‘वेळ आली तर तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावरही जाऊ’
- ‘परदेशातील काळ्या पैशांचा खरा आकडा नरेंद्र मोदींकडे होता’
- ‘पायी वारीबाबत सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता’
- ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, चंद्रकांत पाटलांनी मला शिकवू नये’
- ‘प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी’