मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने कर्नाटक, गोवा आणि राज्याच्या प.किनारपला मोठा तडाखा दिल्यानंतर, अखेर ते गुजरातला जाऊन धडकले आणि मोठी हानी करून शमले. दरम्यान, या चक्रीवादळाचा सर्वात मोठ्या प्रमाणावर तडाखा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे.
या पार्श्वभूमीवर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सर्वप्रथम त्यांनी रत्नागिरीतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. “हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय”, असं सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, “मी कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही,”, असे उद्गार देखील यावेळी त्यांनी काढले.
ते आले… अन् न पाहताच निघून गेले,
मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द.
जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
दरम्यान, त्यांच्या या टीकेचा समाचार भाजपने घेतला असून, भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटर वरून एक ट्विट करत, “ते आले… अन् न पाहताच निघून गेले, मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द. जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे.” अशा तिखट शब्दांत एकाच वेळी मुख्यमंत्री, शिवसेना आणि पाहणी दौऱ्यावर टीका केली आहे.
वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते @Dev_Fadnavis जी यांनी तेच केले. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणविसजी आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली. pic.twitter.com/XTgRJtzzWs
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
तसेच, “वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते देवेंद्र जी यांनी तेच केले. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणविसजी आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली.” असं ट्विट करत फडणवीसांच्या कोकण दौऱ्याचं कौतुक केलं आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आणि किती किलोमीटरचा हे मोजून सांगू का, याला दौरा म्हणायचं?
- हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरुन पाहणी करणार; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला
- “कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही”
- लसीच्या पुरवठ्यावरून सचिन सावंतांनी फडणवीसांना विचारला ‘हा’ साधा प्रश्न
- ‘परीक्षा रद्द करून शिक्षणाची थट्टा चालवली आहे’, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले