मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सध्या जोरदार सभा सुरू आहे. तसेच विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस यांची देखील पोलखोल सभा पार पडली. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या देखील मागील काही दिवसात राष्ट्रवादी संवाद यात्रा पार पडली. आता याच धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी औरंगाबाद याठिकाणी सभा होत आहे. त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
राज ठाकरेंनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची औरंगाबादेत सभा; परवानगीवरुन जोरात राजकारण तापणार?
येत्या 14 तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा आहे. त्यांना त्यांच्या मनातलं बोलायचं. टोमणे कट्टा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यांच्या टीमने तयार रहावं कारण दोन वर्ष टिकेल एवढं मुख्यमंत्री त्यांना मटेरियल देतील. 14 तारखेला शनिवार येतो. कुटुंबाला घेऊन फिरायला जा, काही करा पण UT series नको, असा टोमणा निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“राज ठाकरेंच्या भोंग्याचा आता झाला ठेंगा”; गुलाबराव पाटलांनी उडवली खिल्ली
निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो. ही थापेबाजी परवडणार नाही. परंतु लोक अशाप्रकराची थापेबाजी सतत सहन करू शकत नाही. किंबहुना त्यांनी ही सहन करू नये. 14 तारखेला मी सभा घेणार आहे. तेव्हा तुमच्याशी मनातलं बोलणार आहे. उठसूठ इकडे, तिकडे वार असं करणार नाही. जे मनात आहे ते तुमच्याशी बोलणार. माझ्या मनात काही तुंबलेले नाही, परंतु मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. राजकारण जरूर करा परंतु त्यामध्ये एक दर्जा असला पाहिजे. विरोधी पक्ष हा निव्वळ विरोध करण्यासाठी नसतो. सरकारचे चुकत असेल तर आमचे कान उपटा पंरतु चांगलं काम केल्यास कौतुकही झालं पाहिजे. पण ही दिलदारी सध्याच्या विरोधी पक्षाकडे नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
“भोंग्यांवर कसले बोलताय महागाईवर बोला”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, मागील सर्व सभेत हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार चर्चेत आला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोट ठेवण्याची शक्यता आहे. तसेच मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून विरोधकांना फटकराण्याची शक्यता आहे. आगामी काळात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे.
Read also:
- “निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे
- पक्षशिस्तीचे पालन न केल्यास..; मनसेकडून पदाधिकाऱ्यांना समाज माध्यमांवर भाष्य न करण्यास सुचना
- “काही असुंतष्ट आत्मे पक्ष सोडण्याबाबत अफवा पसरवताहेत, अशा लोकांपासून पक्षाला धोका”; वसंत मोरे
- “आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला लॉलीपॉप दाखवले”; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर घणाघात
- शिरूरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा राजकीय ‘ठिणगी’; ‘पुढचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलच होणार !’, राऊतांची घोषणा