मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी आक्षेप नोंदवला होता. आता यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत बसवल्याने बैठकी दरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. मात्र संभाजीराजे यांनी परिस्थिती हाताळत सामंजस्याची भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीला संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या समन्वयकांनी गोंधळ घातला.
सारथी संस्थेला भरीव आर्थिक निधीची मागणी मराठा समाज सातत्याने करतोय. या बैठकीला संभाजीराजेना तिसऱ्या रांगेत बसण्याचं कारण या सरकारला एवढा माज आलाय कि त्यांना इतरांची किंम्मत कळत नाही. निषेध करतोच पण मराठ्यांना पण कळलं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 9, 2020
यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला हे. निलेश राणे म्हणाले की, सारथी संस्थेला भरीव आर्थिक निधीची मागणी मराठा समाज सातत्याने करतोय. या बैठकीला संभाजीराजेना तिसऱ्या रांगेत बसण्याचं कारण या सरकारला एवढा माज आलाय कि त्यांना इतरांची किंम्मत कळत नाही. निषेध करतोच पण मराठ्यांना पण कळलं पाहिजे तलवारी कधी काढायच्या आणि तह कधी करायचा.
दरम्यान, अजित पवार यांनी सारथी संस्थेला 8 कोटींची मदत जाहीर केली आहे.