राजस्थानमधील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे. आता भाजप घोडेबाजार करत असल्याचा गंभीर आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.
अशोक गेहलोत म्हणाले की, भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे. त्यांच्या तोंडाला निवडून आलेले सरकार पाडण्याचे रक्त लागले आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचे गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे.
गेहलोत म्हणाले की, यावेळी भाजपचा घोडेबाजाराचा खेळ मोठा आहे. मात्र राजस्थान असा संदेश देईल की पुन्हा त्यांची निवडून आलेले सरकार पाडण्याची हिंमत होणार नाही.