मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, राज्यभरातून शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर या प्रकरणी नारायण राणेंना अटक करण्यात आली आणि रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर केला गेला. यातच आता आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले असल्याची माहिती असून, याविरोधात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेना अडचणीत येणार? रश्मी – उद्धव ठाकरेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार दाखल; कारवाई होणार?
भाजप नेते प्रमोद जठार यांच्याविरोधात नाईक यांनी ही तक्रार दाखल केली असून, २४ ऑगस्टला घडलेल्या राजकीय नाट्यादरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी, “छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले. नारायण राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल
दरम्यान, “छत्रपती संभाजी महाराज आमचे दैवत आहेत. प्रमोद जठार यांनी त्यांच्याशी नारायण राणे यांची तुलना केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून, त्याविरोधात कणकवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर आता पोलीस योग्य ती कारवाई करतील. तसेच, जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका सुरुच ठेवल्यास, शिवसेना यात्रेला विरोध करेल,” अशा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.
मोठी बातमी : अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, काय विचारपूर केली…
दुसरीकडे, काल रात्री उशिरा महाड न्यायालयाने नारायण राणेंना जामीन दिल्यानंतर, तातडीने नारायण राणेंनी आपल्या विरोधातील विविध ठिकाणी दाखल केले गेलेले सर्व गुन्हे रद्द व्हावेत आणि आपल्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली आहे. त्यानंतर, न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
Read Also :
- “भोकं पडलेल्या फुग्याला संजय राऊत एवढे का घाबरतात?” – गोपीचंद पडळकर
- भाजप आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई
- एक सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश जारी, महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले
- शिवसेना खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा; ‘ती’ याचिका मुंबई हायकोर्टाचा फेटाळली
- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणी वाढल्या!