मुंबई – ”महाविकास आघाडी सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. अधिवेशनात एसटी कर्मचारी व अन्य अनेक विषय असल्यामुळे सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिवाळी अधिवेशनात आम्ही भूमिका घेण्यापेक्षा कॉग्रेसने भूमिका घेतली पाहिजे, कारण कॉग्रेसला विदर्भातील जनतेने जनाधार दिला आहे,” असे मत विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. ते माध्यमांशी बोलत होते.
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, आलिशान गाड्याही जप्त
दरेकरांनी यावेळी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रविण दरेकर म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका घेतली पाहिजे. पण सत्तेसाठी ते तलवार मान्य करतील. तसं झाल्यास विदर्भावर अन्याय केल्यासारखे होईल. नाना पटोले हे सत्तेसाठी भूमिका घेतात आणि सत्ता टिकवण्यासाठी ते एकमतावर येतात,” ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी एका कार्यक्रमात भाजप-शिवसेना यांनी पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर म्हणाले, ”गोखलेंची ती भूमिका आहे. शिवसेना-भाजप एकत्र येईल की नाही, मला माहित नाही, कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे,”
बाळासाहेब ठाकरे असते तर थोबाडीत लगावली असती – चंद्रकांत पाटील
”शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले पाहिजे, याबाबत मी पुढाकार घेतला आहे. मी याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं,” असे गोखले काल म्हणाले. ”मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे
Read Also :
- शिवशाहिराला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन
- यशोमती ठाकूर राजकीय पोळी भाजण्याचे काम करतायं, मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यावा – रवी राणा
- “राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात”
- वर्ध्यात भाजपला बसला मोठा धक्का; नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक