मुंबई : भाजप नेते, संजय राऊतांवर हल्लबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच, काल संजय राऊत यांनी, “भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे,” असा आरोप केला होता. यावर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, “आरोप किंवा तक्रार दाखल झाली, तर कोणतीही यंत्रणा ही तपासाला सुरुवात करते. त्यामुळे, याप्रकारे बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊतांना नाही. त्यांना भाजप द्वेषाची काविळ झाली आहे. ते अभ्यास न करता आणि अज्ञानापोटी भाजपवर तोंडसुख घेत असतात,” अशी जोरदार टीका केली आहे.
पुणे महापालिकेने दिलेले २०० कोटी गेले कुठे?, ED, CBI चौकशी करा – सुप्रिया सुळे
काल आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यालयात, पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम दाखवला गेला. यावेळी, लाईव्ह स्क्रीनद्वारे त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, “काँग्रेस केंद्रात सत्तेत असताना त्यांनी, त्यावेळेला ईडीच्या चौकश्यांचा दबाव टाकून सत्ता कशी राखली, हे साऱ्या देशाने पाहिलं आहे, देशाला माहित आहे. संजय राऊतांची ही सवयच आहे, ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’, त्यांच्या टीकेला काडीची किंमत नसून, त्यांनी केलेली वक्तव्ये ही संदर्भहीन असतात,” असा हल्लाबोल त्यांनी राऊतांवर केला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक
“ईडी काय किंवा सीबीआय काय, या दोन्ही देशातील स्वायत्त संस्था आहेत. देशाचे संविधान आणि लोकशाही इतकी मजबूत आहे, की देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, त्यांना या संस्थांचा चुकीचा वापर करता येत नाही. त्या स्वतंत्र असून, त्यांच्याच पद्धतीने तपास काम करतात. ज्यांनी चुकीचंच काम केलं असेल, त्यांना तपास यंत्रणेच्या प्रक्रियेला सामोरं जावंच लागणार,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- “लेकीनेही बापाच्या कामाचा विचार करून, त्याच्या कामाची जाण ठेवली पाहिजे”
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- आंदोलन ओबीसी आरक्षणासाठी की, सत्तेच्या हव्यासापोटी; रोहित पवारांची भाजपावर टीका
- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न म्हणजे, भाजपचे पाप; सचिन सावंत म्हणतात…
- ‘सर्वकाही मनाप्रमाणे होईल, पण संन्यास घेऊ नका’, फडणवीसांवर सामनातुन खोचक टीका