राजस्थानमधील ही परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामुळेच उद्भवली आहे. गांधी घराण्याचे लोक जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोपर्यंत काँग्रेस पाताळात जाईल, अशा शब्दांत भाजपा ज्येष्ठ नेत्या उमा भरती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
उमा भरती म्हणल्या , “सध्या निर्माण झालेले संकट हे राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळेच निर्माण झालेले आहे. ते तरूणांना अपमानित करतात. ते स्वत: काम आणि मेहनत करू इच्छित नाहीत. त्यांच्या पाठीपाठी करणाऱ्यांनाच सरारमध्ये राहावेत अशी त्यांची इच्छा असते,” .
तसेहच तरूण आणि बुद्धीवान नेत्यांना त्यांनी एवढा अपमान केला की तो त्यांना सहन झाला नाही. त्यांच्या समोर दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सचिन पायलट हे राजेश पायलत यांचे सुपुत्र आहेत. राजेश पायलट हे माझ्या भावासारखे होते. आमचे कौटुंबीक संबंध आहेत आणि सचिन पायलट हे स्वाभिमानी व्यक्ती आहेत हे मला माहित आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकं जोपर्यंत काँग्रेसमध्ये असतील तोवर काँग्रेस पाताळात जाईल,” असेही त्यांनी सांगितले
राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर सत्तासंघर्षांचे संकट आले आहे . दरम्यान घोडेबाजाराच्या प्रकरणात नोटीस आल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत गेले होते. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांच्या कार्यालये व निवासस्थानावर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्याला एक वेगळे च वळण मिळाले होते . दरम्यान, राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय नाट्याला उमा भारती यांनी राहुल गांधी यांनाच जबाबदार धरलं आहे.