पुणे : राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, राष्ट्रवादीवर केलेल्या जातीयवादाच्या आरोपावरून राष्ट्रवादी-मनसे मध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काल पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा, “राष्ट्रवादीच्या जन्माननंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष वाढला. हे सर्वांना माहिती होतं. बोललो फक्त मी,” असा चिमटा काढला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर भाजकडून पहिल्यांदाच भाष्य केलं गेलं आहे.
रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर दोनच शब्दात उत्तर दिलं असून, “राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या वादात भाजपने उडी घेतल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “भाजपच्या यात्रांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सगळीकडॆ भाजपमय वातावरण झालेलं आहे. त्यामुळे आघाडी सरकार भांबावून गेलं आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.
मी प्रबोधनकार पण वाचलेत आणि यशवंतराव पण – राज ठाकरे
यावेळी त्यांनी, तिसऱ्या लाटेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना, “दुसऱ्यांकडे बोटं करताना स्वतःखाली काय जळतंय, हे यांना दिसत नाही का? हे जेव्हा कार्यक्रम घेतात तेव्हा कोरोना नसतो आणि नेमका आमच्याच वेळी कोरोना होतो का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच, मनसेसोबत युती करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नसून, तसा विचारही नाही. पण भाजपसोबत मनसे पदाधिकारी येत असतील, तर ती राज्याच्या हिताचीच बाब आहे. मनसे जबाबदार पक्ष आहे,” असं विधान केलं आहे.
राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर केलेल्या ‘त्या’ आरोपावर अजित पवार उत्तरले, म्हणाले…
दरम्यान, शरद पवार आणि नवाब मलीक यांच्या टीकेनंतर आता राज ठाकरेंवर अजित पवार यांनी टीका केली असून, “कधी तरी काही लोक असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं करण नाही,” असा निशाणा साधला आहे, तर सुप्रिया सुळेंनी, “हे दडपशाहीचं सरकार नाही. इथे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे,” असा हल्लबोल केला आहे. दुसरीकडे, रोहित पवारांनी, “राज ठाकरे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो.” असं कौतूक केलं आहे.
Read Also :
- तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
- भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
- कोरोना मधून जगायचं, महागाईमध्ये मरायचं; दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ आंदोलन
- भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले