मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरात, मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून, “फाळणीचा दिवस विसरु नका, असे पंतप्रधानांचे फर्मान आहे. देशाचे झालेले विभाजन म्हणजे एक अराजकच होते. पाकिस्तानच्या निर्मितीचे गुन्हेगार, केवळ म.गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पण याच गोळ्या त्यांनी बॅ. जीनांवर झाडल्या असत्या, तर फाळणीचा असा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती,” असे ते म्हणाले.
मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर ‘बुलडोझर’, आता पुढे परब? सोमैय्या म्हणतात, “करून दाखवले!”
दरम्यान, यावरून आता भाजपने टीका केली असून, भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी, “सामनाचे नाव बदलून आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे,” असा हल्लबोल करत, “कुणामुळे फाळणी झाली याबद्दल दुमत नाही. गांधीजींवर गोळीबार, हल्ला किंवा त्यांचा खून झाला, याचे कुणी समर्थनही करत नाही. संजय राऊत यांनी, या देशाचा वेगळा इतिहास लिहिणाऱ्या काँग्रेसच्या प्रयत्नांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे,” अशी टीका केली आहे.
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र! बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान
तसेच, “संजय राऊत, विपर्यासाचे विच्छेदन कितीही केले, तरी सत्याला लपवता येत नाही. भारतीयांच्या फाळणीच्या आठवणींना आणि एक प्रकारे इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठी, म्हणून तो दिवस पंतप्रधानांनी घोषित केला. त्यामुळे, पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले आणि संजय राऊत रुपी संपादकाच्या हातून ‘सामना’त त्याच पद्धतीच्या भावना उतरायला लागल्या. त्यामुळे, आता ‘सामना’चे नाव बदलून ‘पाकिस्ताननामा’ किंवा ‘बाबरनामा’ करावे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
Read Also :
- शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…
- आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
- “उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
- “एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट