मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22व्या वर्धापनादिना निमित्ताने बोलताना शरद पवार यांनी शिवसेना विश्वास असणारा पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यांच्य या वक्तव्यानंतर आता भाजपकडून टीका केली जात आहे.
कधी वाटलं नव्हतं शिवसेनेबरोबर आपण सरकार बनवू. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला होता.
विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 10, 2021
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला असून, या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे?, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
Read Also :
- मंत्रिमंडळ बैठक : ठाकरे सरकारने घेतले हे महत्त्वाचे निर्णय
- ‘मुंबईत सगळं ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?’
- रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला, म्हणाले…
- ‘राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव’
- Video : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात साकारले 53 फूट उंचीचे भित्ती चित्र