भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सामनाच्या अग्रलेखातून दूध आंदोलकांवर केलेल्या भाष्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला बोल केला आहे. दूध आंदोलनाला सामनाच्या अग्रलेखात राजकीय लफंगेगिरी म्हटलंय.यावरून अतुल भातखळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना धारेवर धरत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
या विषयी बोलताना नाव न घेता ते संसदेमध्ये असताना त्यांनी दूध भुकटी आयाती विरोधात कितीवेळा आवाज उठवला असा सवाल अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. तसेच त्यांचे नेते लॉकडाऊनच्या काळात सेलिब्रेटींच्या पार्टीला जातात याविषयी ते बोलणार का असा सवाल देखील भातखळकर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शासकीय तिजोरीतून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सामनासाठी जाहिराती दिल्या जातात या लफंगेगिरी विषयी आता ते बोलणार का ? असा देखील प्रश्न यावेळी अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
दूध आंदोलनाला सामनाच्या अग्रलेखात राजकीय लफंगेगिरी म्हटलंय.
कोण म्हणतंय, कोरोनाच्या काळातही ज्यांची वाटमारी सुरू आहे ते! शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढणे लफंगेगिरी असेल तर शंभरवेळा करू. लॉकडाउनमध्ये लोकांना वाऱ्यावर सोडून सेलिब्रिटींसोबत पार्ट्या झोडणे ही खरी लफंगेगिरी.@OfficeofUT pic.twitter.com/IDNKXKErRK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 3, 2020