मुंबई : नुकत्याच न्यायालायने सुनावलेल्या, मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात मोठी खळबळ उडाली असून, यामुळे एकीकडे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत तर, विरोधकांनी देखील मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली.
दरम्यान, यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत. यात त्यांनी ज्या तत्परतेने मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिलं, त्याच तत्परतेने राज्यातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन आपण बहुजनांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी बोचरी टीका केली आहे.
तसेच त्यांनी, आरक्षणाला महाविकास आघाडीच जबाबदार आहे असं सांगत, “हे आरक्षण रद्द झालं पण बाकीच्या समाजाचं काय? त्यांच्या जीवाशी मात्र खेळ चालू आहे. त्यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा त्यांनी आंदोलनाचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Read Also :
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल
- आरोग्यमंत्र्यांवर होतोय “हा” आरोप, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चौकशीचे आदेश
- प्रणिती शिंदे झाल्या आक्रमक, उजनीच्या पाण्यावरून आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना अजून एक पत्र लिहून केली महत्वाची मागणी, म्हणाले…