पुणे : भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज असून ते थकीत आहे. मागील दोन वर्षापासून हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु कारखाना तीन वर्षापासून कारखाना बंद असून, पुन्हा सुरु होण्याची काहीच चिन्ह दिसत नाही. यामुळे जिल्हा बँकेने कारखान्याला नोटीस बजावली आहे.
“दोन्ही निकाल माझ्याच बाजूने, देश कायद्याने चालतो”- नारायण राणे
थकीत कर्जाची लवकरात लवकर परतफेड केली नाही तर कारखाना बँक ताब्यात घेईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली आहे. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याच्या बोगस कारभाराची माहिती देण्यासाठी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली नागवडे उपस्थित होत्या.
शिवसेनेला भिडणाऱ्या कार्यकर्त्यांचे निलेश राणेंनी मानले मनापासून आभार
थोरात यांनी सांगितले की, सन २०१७-१८- पासून भीमा पाटस साखर कारखाना बंद आहे. त्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी ३६ कोटी रुपयांची मदत केली होती. मात्र, शासनाची मदत मिळूनही कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल यांना कारखाना सुरु करु शकले नाहीत. कारखान्याने सभासदांसह कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांची देखील फसवणूक केली आहे. कायदेशीर थकहमी देत एकाच ट्रॅक्टरवर पाच-पाच बँकांकडून कर्ज घेतले आहे.
मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
कारखान्याच्या गळीत हंगामासाठी सातशे ट्रॅक्टरवर प्रत्येकी ४० लाख प्रमाणे १२७ कोटी रुपयांचे कर्ज घेते असून हे कर्ज देखील थकीत आहे. दौंडचे आमदार राहुल कुल व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी नुसत्या गप्पा न मारता हजारो शेतकरी व सभासदांचे हित लक्षात घेऊन साखर कारखाना सुरु करुन दाखवावा. कुल यांच्या बोगस कारभारामुळे कामगार, शेतकरी, ग्राहक अडचणीत आले आहेत. यासंदर्भात कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची लेखी मागणी सहकार आयुक्त यांच्याकडे केली आहे.
Read Also :
- एक सदस्य प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश जारी, महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल
- काँग्रेस – राष्ट्रवादीची काय औकात, भांडण लावून सत्तेत आले – चंद्रकांत पाटील
- परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या त्यात गैर काय?- विनायक राऊत
- नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- आयकर विभागाकडून भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त, अटकही होणार! सोमय्यांचा दावा