मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व यावर राजकीय वाद चालू आहेत त्यातच आता नव्या वादाचं कारण म्हणजे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी. अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यादरम्यान औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात भाजपाकडून ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. आता या मुद्द्यावरून राम कदम यांनी ठाकरे सरकारला खुलं आव्हान दिलं आहे.
राज्यकर्त्यांनो सरकार अजून किती मुडदे पाडणार; बीडमधील शेतकरी आत्महत्यानंतर राजू शेट्टी संतापले
“महाराष्ट्र सरकारला लोकांवर राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा भारी शौक आहे. एवढी जर तुम्हाला एवढीच हौस आहे, तर राजद्रोहाचा गुन्हा ओवैसींवर लावा ना. तुमची किती हिंमत आहे, किती साहस तुमच्यामध्ये आहे हे महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांना पाहायचंय. ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यासाठी जातो? काय कारण?” असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
“टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
“ज्या औरंगजेबानं आयुष्यभर छत्रपती शिवरायांना छळण्याचा प्रयत्न केला, कैद केलं. संभाजीराजांचे डोळे फोडले, जीभ छाटली. त्यांना क्रूरपणे मारण्यात आलं. या देशात हिंदूंना राहायचं नाही, राहायचं असेल तर त्यांना जिझिया कर द्यावा लागेल असे जुलमी प्रकार ज्या औरंगजेबानं केले, देशाच्या मातीबरोबर खऱ्या अर्थानं गद्दारी केली. मंदिरं तोडली. अनेकांचा छळवाद मांडला. देशाच्या मातीशी गद्दारी केली, त्या औरंगजेबाच्या कबरीवर कुणी डोकं टेकवण्यासाठी जात असेल तर तो गद्दार नाहीये का? तो राजद्रोह नाहीये का? या सरकारमध्ये जर हिंमत असेल, तर आधी ओवैसींवर राजद्रोह लावावा”, अशा शब्दांत राम कदम यांनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे
संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
नेमकं काय घडलं?
अकबरुद्दीन ओवैसी गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीला यावेळी भेट दिली. त्यांच्यासोबत इम्तियाज जलील, वारिस पठाण असे एमआयएमचे इतर नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, महाराष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर ते गेल्यामुळे त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. या घटनेची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहेत.
Read also:
- हिंदूजननायक शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’; शिवाजीराव आढळराव पाटलांनी दिली नवी उपाधी
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिंदुत्वाच्या अग्नीशी खेळण्याचा प्रयत्नही करु नका”; अकबरूद्दीन ओवेसीला मनसेचा इशारा
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा
- “नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”