नाशिक : पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी योजनेत 700 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला. या घोटाळ्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्याच्या कंपनीनेच हा भ्रष्टाचार केला आहे. प्रसाद लाड असं या नेत्याचं नाव आहे, 700 कोटीच्या घोटाळ्यामागे भाजपच्या आमदाराचाच हात आहे, असा दावाच खासदार राऊत यांनी केला आहे. राऊत आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावरून भाजपला घेरले.
राज ठाकरे यांची तब्येत बिघडली; मनसेचे मुंबई, पुण्यातील मेळावे अचानक रद्द
राऊत म्हणाले, मी तुम्हाला स्मार्ट सिटीचा घोटाळा दिला. भाजप नेत्याची ही कंपनी आहे. त्याचे कुटुंबीय ही या कंपनीत आहेत. प्रसाद लाड असं त्यांचं नाव आहे, असं सांगतानाच भ्रष्टाचाराविरोधात लढताय तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही 10 प्रकरणं काढताना 11 वा घोटाळा काढा. तुम्ही 24 हजार घोटाळे काढा. खोटे आहेत ते. बोगस आहात तुम्ही. काल अजितदादांनी जरंडेश्वरप्रकरणात जी कागदपत्रं त्यावर काय उत्तर आहे?, असा सवाल करतानाच ही बकबक काही काळ चालेल, राज्यातील जनता बकबकीला अजिबात उत्तर देत नाही. ही तुमची बकबक आणि पकपक हेच एकदिवस तुमच्या पक्षाच्या राजकारणाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.
sent following letter to 'Scam crusader'@kiritsomaiya.it gives details of misappropriation of Funds to the tune of 500 cr Rs in the smart city project run by Pimpari chinchwad corporation ruled by BJP.Hope he will use his influence on ED to start the investigation.@NirajGunde pic.twitter.com/sPiSKSjGTH
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 20, 2021
दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पिंपरी चिंचवडमधील 700 कोटीच्या घोटाळ्याबद्दल पत्र लिहिलं होतं. या घोटाळाप्रकरणी ईडी आणि सीबीआय कारवाईसाठी पाठपुरावा करण्याचं आव्हान केलं आहे. तसेच, सोमय्या या माहितीच्या आधारे ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरावा करतील, अशी संजय राऊत यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच आज नाशिकमध्ये बोलताना त्यांनी थेट भाजप आमदार प्रसाद लाड यांचे नाव घेवून त्यांच्या कंपनीचा भ्रष्टाचारात हात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता भाजप यावर काय भुमिका घेणार? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का? गोपीचंद पडळकरांचा राऊतांवर हल्लाबोल
- एक एकर शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी द्या; शेतकऱ्याच पत्र
- वाटोळ करायचं अन् मी नाही… मी नाही… काही केलं म्हणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजे संतापले
- तक्रारदार तक्रार करून गायब झाला, कुठे गेला माहित नाही, पण केस सुरू आहे; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
- सरकारच्या जीआर’ वर औरंगाबाद’च्या अगोदर संभाजीनगर; नामकरणाचा वाद पुन्हा पेटणार?