जळगाव : जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे. यावरुन शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्षा खडसे यांना जोरदार टोला लगावलाय. खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबादच नाव संभाजीनगर करून दाखवाच – खासदार इम्तियाज जलील
गुलाबराव पाटील म्हणाले, एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्यानं असा आरोप केला तर ठीक आहे. पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला हारवणे शक्य नाही, म्हणून खुद्द शरद पवार रणांगणात – चंद्रकांत पाटील
एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येणार आहेत. तर मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे बिनविरोध निवडून येणार आहेत.
Read Also :
- पिंपरी चिंचवडनंतर आता शरद पवारांची पुणे महापालिकेकडे कूच; दिवाळीनंतर सत्तांतराची रणनिती आखणार!
- आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळा गोंधळ संपेना; एकाच वेळी चार परिक्षांचे वेगवेगळे केंद्र, विद्यार्थी संतापले
- औरंगाबादच नाव बदलण्याची आमच्यात हिंमत आहे, तुम्ही मैदानात या, दाखवतो – चंद्रकांत खैरे
- माझ्या मागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे – संजयकाका पाटील
- शाहरुख खाननं भाजपात प्रवेश केला तर कोकेन नव्हे, पीठ सापडलं म्हणून सांगतील – छगन भुजबळ