मुंबई : राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीला जेरीस आणण्याचे आणि कोंडीत पकडण्याचे अनेक शर्थीचे प्रयत्न विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केले जात असून, त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या आणि टीकेच्या फैरी झाडल्या जात आहेत. सध्याच्या सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये देखील आज एका वाघावरून राजकीय जुगलबंदी सुरु असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात हा कलगीतुरा रंगलेला आहे.
काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. मात्र, फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, का? ते माहीत नाही. पण, इकडे जर वाघाशी दोस्ती असती, तर आमचे सरकार आले असते. मात्र, मोदींनी सांगितले, तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. आम्ही वाघाशी दोस्ती करू,” असे म्हटले होते.
यावर, आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, ‘चंद्रकांत दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो,’ असे प्रत्युत्तर दिले होते.
दरम्यान, आता या वादात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली असून त्यांनी ट्विट करत, ‘नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची,’ असा जोरदार हल्लबोल संजय राऊत यांच्यावर केला आहे.
नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची. https://t.co/qFVgOc6nCQ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 10, 2021
दुसरीकडे आज पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी देखील, “काल मला कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने भेट म्हणून वाघ दिला. मी म्हटलं, चांगलंय आमची वाघांशी दोस्ती आहे. तेव्हा पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. आम्ही दोस्तीचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण, आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या नाही. हा वाघ जोवर पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोवर आमची दोस्ती होती. मात्र, आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला झाला आहे”, असा पलटवार केला.
Read Also :
- ‘सत्तेसाठी भाजपकडून ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप’
- ‘आगमी पुणे महापालिका निवडणूकीसाठी गिरीशभाऊच असतील आमचे संकटमोचक …’
- ‘‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो हे लक्षात असू दे.’’ – भाजप
- ‘भाजप अगदी ‘दूध के धुली’ आहे, त्यांना जे भुंकायचं आहे ते भुंकू देत’ – शिवसेना
- ‘सरकारकडून माझ्या मागण्यांवर विचारही झाला नाही आणि कुणी किंमतही दिली नाही’ – संभाजीराजे छत्रपती