पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही, मुलखात होत नसल्याने आणि नोकरी मिळत नसल्यामुळे दौंडमधील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. यांनतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाने राज्यात उग्र स्वरूप धारण केले. विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. या घटनेनंतर राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांना मदत जाहीर केली.
ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाचा १०० कोटी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा झटका
दरम्यान, आज भाजपच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना एक मोठी मदत करण्यात आली आहे. स्वप्निलच्या कुटुंबियांवर शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचं मोठं कर्ज होतं. तसंच त्याच्या वडिलांचा असलेला प्रिटींग प्रेसचा व्यवसायही बंद झाला होता. या कार्यक्रमात फडणवीसांनी १९ लाख ९६ हजार ९६५ रुपयांच्या कर्जाची परतपेड करणारा धनादेश, स्वप्निलच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करून त्यांच्या कर्जाची परतफेडं केली आहे.
देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, तर मग हे काय? रोहित पवार म्हणतात….
यावेळी, “हे कर्ज फेडण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला. या घटनेनंतर सरकारने तत्त्काळ मदत करणं अपेक्षित होतं, पण सरकार संवेदनशील नाही, ही पतसंस्था कुणाची आहे, त्यात मला जायचं नाही, पण यानंतर त्यांचं कर्ज माफ करता आलं असतं,” असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. दरम्यान, भाजपकडून कर्जाची परतफेड करण्यात आल्यानंतर सुनील लोणकर यांना अश्रू अनावर झाले होते.
वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोणकर कुटुंबीयांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी, “आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. काळजी करू नका,” अशा शब्दांत कुटुबियांना धीर दिला आहे. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल,” असे आश्वासन दिले.
माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला, त्याचा मीही साक्षीदार ठरलो.
एकीकडे 'शब्दाला जागणारी' भाजप आणि दुसरीकडे 'शब्द फिरवणारे' महाविकास आघाडी सरकार!
2/2 pic.twitter.com/BEyeMDUOC3— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 22, 2021
अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
मात्र, त्याच्या आत्महत्येने काही सवाल या यंत्रणेवर उपास्थित केले आहेत, ते राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार अस्तित्वात असले तरीही उपस्थित होतात, ते असे की स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं? एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे सगळं काही ऑनलाईन सुरु असताना, सरकार आणखीन काही पर्याय यासाठी का शोधू शकली नाही?
मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
सरकारची जबाबदारी काय आहे? उद्या राज्याच्या प्रशासनात अधिकारी म्हणून रुजू होणाऱ्या या पोरांपैकी, अजून एखाद्या पोराने दुर्दैवाने असं टोकच पाऊल उचललं तर? रिक्त जागांचा आणि परीक्षेचा प्रश्न सरकार कसा आणि कधी सोडवणार? या प्रश्नांच्या उत्तराची वाट विद्यार्थी पाहत आहेत.