मुंबई : मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाला. या कार्यक्रमात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. यावरूनच आता भाजपने उद्धव ठाकरेंना टोला लगावत, शरद पवारांना प्रश्न केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, “शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, पण कशासाठी कौतुक?,” असा सवाल त्यांनी केला.
“शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं, पण कशासाठी कौतुक? कारण गेले दिड वर्ष भाषणातले शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन व त्यांचं ड्रायव्हिंग या हेच तर जनता पहातेय. ते जे प्रकल्प सुरू करत आहेत ते सुरू केले देवेंद्र फडणवीस यांनी”, असा प्रश्न ट्विट करत पवारांना केला आहे आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
उलट मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगायचीच तर…
◾️कोरोनातील अपयश
◾️मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश
◾️ओबीसी आरक्षण अपयश
◾️पूरग्रस्तांना मदतीत अपयश
◾️शेतकऱ्याना मदतीत अपयश..
ही अपयशाची यादी वाढू शकते…2/2— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 2, 2021
तसेच, “उलट मुख्यमंत्र्यांची कारकीर्द सांगायचीच तर…कोरोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपय, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश..ही अपयशाची यादी वाढू शकते”, असा हल्लाबोलही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
दरम्यान, “अलीकडे राज्यावर सातत्याने नवीन संकटे येत आहेत. आत्ता आलेले अतिवृष्टीचे संकट मोठे आहे; पण या संकटांवर मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. एकीकडे पूरग्रस्तांची घरे बांधण्याचे आव्हान आहे, तर दुसऱ्या बाजूला १०० वर्षे मुंबईत कष्ट करून देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे,” या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.
Read Also :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच भिडले शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते
- “भाजपचा अंतकाळ जवळ, कारण निष्ठवंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय”
- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा, संजय राठोड यांचा पाय खोलात
- राज्यपालांचे वागणे झालेय भाजपच्या कार्यकर्त्यासारखे; नाना पटोले यांची टीका
- निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही, आता सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या हातात