परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पदनियुक्तीवरुन शिवसेना-राष्ट्रवादीतील राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गोयल यांच्या नियुक्तीनंतर घडलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, त्यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. पण त्यांची नियुक्ती होऊ नये यासाठी, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मंत्रालयात लॉबिंग केल्याची चर्चा होती. या प्रकरणावर आता त्यांनी उजेड पाडला असून, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
“लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू. माकडीण सुद्धा जेव्हा स्वतः बुडायची वेळ येते, तेव्हा पिल्लांना पायाखाली घालते. आम्हीही राष्ट्रवादीला असंच घालू. फक्त कलेक्टर बदलायची मी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली, पण त्यासाठी त्यांनी एवढं रान पेटवलं. आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे”, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जालन्यातील शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर जाहीर कार्यक्रमात संजय जाधव बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता भाजपने प्रतीकिरिया दिली असून, महाराष्ट्र भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत, “राष्ट्रवादी-शिवसेना, तुम्ही दोघं हवं ते करा, एकमेकांना बुडवा किंवा बुडवू नका पण महाराष्ट्राला या दोघांपासून वाचवा अशी प्रार्थना सध्या जनता करत आहे”, अशी जोरदार टीका केली आहे.
तुम्ही दोघ राष्ट्रवादी-शिवसेना हव ते करा, एकमेकांना बुडवा नका बुडवू पण महाराष्ट्राला या दोघांपासून वाचवा अशी जनता प्रार्थना करतेय. pic.twitter.com/rNFaqC0jY1
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 9, 2021
“लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
जालन्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर, ३१ जुलैला आंचल गोयल पदभार स्वीकारणार होत्या. त्या २ दिवस आधीच जालन्यात आल्या असताना, अचानक त्यांची बदली रद्द करण्यात आली आणि याची माध्यमांनी दखल घेतली. मग समाजमाध्यमावरही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. यांनतर २४ तासांच्या आत अंचल गोयल याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे पालकमंत्र्यांना जाहीर करावे लागले.
Read Also :
- मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न
- आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
- मोदी सरकार आज दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार; मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार?
- ‘‘कुणी विचारलं तर पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला सांगा’’, अजित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला
- मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु