No Result
View All Result
मुंबई: आर्यन खान प्रकरण दिवसेंदिवस चिघळत आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध एनसीबी, केंद्र सरकार असा संघर्ष जणू पाहायला मिळत आहे. आर्यन खान याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय खोलात असल्याचे चित्र आता समोर आले आहे.
त्यातच आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे दिवसेंदिवस समीर वानखेडे यांच्या विरोधात पुरावे सादर करत आहेत. आता समीर वानखेडे यांच्याकडून हे प्रकरण काढून घेण्यात आले आहे. याप्रकरणी आता भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित भारतीय(कंबोज) हे वानखेडेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत.
मोहित भारतीय यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहे असा दावा केला आहे. त्यापूर्वी त्यांनी एक बॉम्बगोळा टाकून खळबळ उडवून दिली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे एकूण ३ हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडण्यात आलेले आहे. भंगारवाला कोणत्या पद्धतीने आणि कसा करोडपती झाला हे राज्यातील जनतेला आता कळायलाच हवं असं भारतीय यांनी म्हटलं आहे.
आपण नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहोत आणि त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा दावा भारतीय यांनी केला आहे. राज्यात सध्या सलीम जावेदने चित्रपट सुरु केला आहे. त्याचा द एन्ड मीच करणार आणि त्यानंतर नवाब मालिकांना उत्तर देण्याची लायकी देखील उरणार नाही असा घणाघात भारतीय यांनी केला आहे.
आरोप शंभर, पण पुरावा एकही दिला नाही
मलिक यांनी आमच्यावर १०० प्रकारचे आरोप केले आहेत. पण त्यांना एकाही आरोपावर पुरावा देता आलेला नाही. ते खासगी त्रासाचा सूड उगवत नाही का ? त्यांचे नरेटिव्हज सर्व खोटे आहेत. महाराष्ट्रात यापूर्वी असं गलिच्छ राजकारण करण्यात आलेलं नाही असं देखील भारतीय यांनी म्हटलं आहे.
आता एनसीबीने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे कुणावरही आरोप होणार नाही. नॅशनल, इंटरनॅशनल अशा सर्व अंगानी प्रकरणाचा आता तपास होईल . आता नवे अधिकारी तपास करणार आहेत. त्यांचंही बर्थ आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्याचं काम होईल, असा टोलाही त्यांनी मलिक यांना लगावला
No Result
View All Result