कोल्हापूर : सध्या राज्यात भाजपच्या ‘जन आशीवार्द’ यात्रेवरून गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत असून, नारायण राणेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले
आज खासदार संजय राऊत यांनी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर प्रत्युत्तर देताना, “आम्ही सभ्यपणा पाळत आहोत. आमच्याकडेही कुंडल्या आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो, हे लक्षात ठेवा, असं ते म्हणाले. “शिवसेना खासदार संजय राऊत, हे साधे नगरसेवकही झाले नाहीत. त्यामुळे, त्यांनी कोण शाहणं आणि कोण वेडं हे ठरवू नये. ते त्यांनी लोकांवर सोडून द्यावं,” असा घणाघात त्यांनी केला.
नाव राणे आणि चर्चा करतात फक्त चार आण्याची; अब्दुल सत्तारांची सणसणीत चपराक
तसेच, त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला, “अनिल परब यांच्या विरोधात तक्रार झाली आहे. प्रो ऍक्टिव्हली स्वत:हून ऍक्शन होण्याची शक्यता आहे, आम्ही त्याची वाट पाहतोय. नाहीतर आम्हीच लवकर तक्रार करु,” असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, सुप्रिया सुळे यांनी फडणवीस-उद्धव ठाकरे भेटीवर, आमचं सरकार २५ वर्षे चालेल. भाजप-शिवसेना नेते भेटले की लगेच युती होत नसते,” असं म्हणाल्या. त्यावर “सुप्रिया सुळे कधीपासून युतीच्या प्रवक्त्या झाल्या?” असा सवालही त्यांनी व्यक्त केला.
“…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
यावेळी, त्यांनी शिवसेना-भाजप युतीची शक्यता नाकारली. “केंद्राने आरक्षणाविषयी सर्व प्रश्न सोडवले आहेत. आता गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे, आता त्या प्रश्नांकडे राज्य सरकारने लक्ष देऊन सोडवणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले. खडसेंवरच्या ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना त्यांनी, “सीडी लावायचा निर्णय आता त्यांनीच घ्याव. मात्र, भाजपत कुणी चुकीचं वागलं, तर त्याच्यावर कारवाई होतेच,” असा टोला त्यांनी खडसेंना लगावला आहे.
Read Also :
- मी न घाबरणारा मराठा! छोटेखानी भाषणात ऍड. उज्ज्वल निकम यांचे उद्गार
- पुणे महापालिकेचा तालिबानी कारभार: दिवसाला १० लाख रुपये वसूल करा, पालिका प्रशासनाने दिलं टार्गेट
- जोर का झटका : नारायण राणे यांना बसला विजेचा शॉक, सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत नाही
- “त्या एका व्यक्तीमुळे भाजप-शिवसेनेचं २५ वर्षाचं नातं बिघडलं,” संजय राऊतांकडून नाव जाहीर
- राजनाथ सिंग यांचे महाराजांवरचे ‘ते’ वक्तव्य वादात, कोल्हेंकडून निषेध तर संभाजी ब्रिगेडची माफीची मागणी