अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावतीच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी, पुढील निवडणुकांत भाजपसोबत कोण असेल आणि कोण नसेल याबद्दल बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाव न घेता सडकून जळजळीत टीका केली. आता पुन्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला असून, सोबत त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही निशाणा साधला.
देशमुखांच्या जावयावर केलेल्या कारवाईनंतर, सुप्रिया सुळेंचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
“त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसलाच आहे. आधी युती करायची, मोदींच्या नावानं मतं मागायची आणि जागा आल्या की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं. जेव्हा विधानसभा निकाल लागत होते, त्यादिवशी ४ वा. फडणवीस-ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार होती. मी पुण्यातून येत होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुम्ही तुमची पीसी करा, माझी मी करतो असं म्हटलं आणि तिथेच गडबड झाली हे लक्षात आलं. मग आधी युती का केली? हा विश्वासघात नाही का? मग मी म्हटलं त्यात चुकीचं काय?” असा सवाल त्यांनी केला.
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाने केली अडचणीत वाढ
तसेच, “शिवसेना फक्त मुंबईत होती. त्यांना प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन मराठवाडा-विदर्भात आणलं आणि आता ते ५६ वर आहेत,” असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपरोधात्मक बोलताना, “त्यांची क्लिन चिट मिळाली की नाही याबद्दल चौकशी सुरु आहे. देशमुख यांनी दरोडा घालायचा आणि त्यांना पोलिसांनी अटक करायची नाही, तर काय हार घालयचा आणि स्वागत करायचं का? त्यांची संपत्ती जप्त होते आहे, ती काय उगाच होत आहे का?” असे सवाल केले.
CBIचा अहवाल फोडल्याने अनिल देशमुखांच्या जावलयाला अटक; गौरव चतुर्वेदीची वीस मिनिटे चौकशी
दरम्यान काल बोलताना त्यांनी, “काही पक्ष भाजपसोबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोतांचा रयत क्रांती संघटना; याशिवाय आणखी काही छोटे पक्ष देखील आमच्या सोबत आहेत. मात्र पाठीत खंजीर खुपसणारे असं म्हटलं की आधी एकाच नेत्याचा चेहरा समोर यायचा, आता आणखी एक दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” असा जोरदार हल्लाबोल ठाकरेंवर केला होता.
Read Also :
- शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करा – अजित पवार
- उद्धव ठाकरेंचा झटका: मंत्रालयातील ३०० ‘पॉवरफुल्ल’ एकाचवेळी अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या
- “उघड दार उद्धवा आता…”; मंदीरे उघडण्यासाठी भाजपच्या शंखनादानंतर मनसेचे घंटानाद आंदोलन
- 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
- खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला