मुंबई : काही दिवसांपूर्वी रासायनिक आणि मिश्र खतांच्या दर वाढीवरून केंद्र सरकारवर, राज्यातल्या महाविकास आघडी सरकारमधल्या अनेक मंत्र्यानी टीकेची झोड उठवली होती. तसेच, भाजप आणि भाजपेतर अनेक नेत्यांनी पंतप्रधानांना आणि केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून दर वाढ मागे घेण्याची विनंती देखील केली होती.
दरम्यान, आज मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, डीएपी खतांच्या किंमतीवरील सब्सिडी १४० टक्क्यांनी वाढवली असून, आता डीएपी खताची एक बॅग शेतकऱ्यांना जुन्याच किंमतींना मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
यावरून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्र सरकारवर १४७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसून शेतकऱ्यांना, होत्या त्याच किंमतीत डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे. कंपन्यांनी खतांमध्ये दर वाढ केल्यानंतर, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार, सातत्याने प्रयत्न करत होते. त्या दृष्टीने निर्णय घेण्याच्या टप्प्यात सरकार होते. तसेच, सरकार शेतकऱ्यांना अनुदान वाढवून देण्याच्या विचारात आहे, असे प्रसिद्धीपत्रक देखील केंद्र सरकारने १५ मे रोजी जारी केले होते.
मात्र, विषय जाणून न घेता आणि सरकारला निर्णयप्रक्रियेसाठी पुरेसा वेळ न देता, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने टीका सुरु केली, तसेच आंदोलनाचाही इशारा दिला. आता जेव्हा मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, तेव्हा याबद्दल या पक्षांनी सरकारचे आभार मानायला हवेत,” असे आवाहन केले आहे.
तसेच, “काँग्रेसप्रणित सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी १ एप्रिल २०१० पासून लागू केले. त्यानुसार केंद्राने डीएपीसारख्या खतांसाठी अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमत ठरविण्याची मोकळीक द्यावी, असे धोरण लागू झाले. त्यामुळे या कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले. या खत दर वाढीला सुरुवात, शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना आणि मनमोहन सिंग यांचे सरकार देशात असतानाच झाली”, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि काँग्रेसवर निशाणा साधला.
Read Also :
- ‘राज्यभर फिरण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ई – पास काढलाय का?’ RTI अंतर्गत याचिका दाखल
- शिवसेना खासदार म्हणाला, ‘ नरेंद्र मोदी दिलदार पंतप्रधान’
- ‘ईडी येऊ देत आणि जाऊ देत, आमच्यासाठी ईडी म्हणजे…’
- ‘साहेबांच्या पत्रानंतर फोनाफोनी झाली आणि खतांची किंमत झटक्यात खाली आली’
- राज्यातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं; राज ठाकरेंची कलावंतासोबत ‘झूम’ मिटिंग