मुंबई : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. पण, त्याआधी आघाडी सरकार आणि भाजपत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून, ज्या ४३ साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही २ कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे पाटील आणि गडकरी यांच्या राजकीय संबंधात अडचण निर्माण होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; MPSC वाल्या विद्यार्थ्यांचे तीन तेरा वाजले – फडणवीस आक्रमक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली. यावर चंद्रकांत पाटलांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून, या सर्व ४३ कारखान्यांची ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली असल्याने राज्यात वादंग निर्माण झाला आहे. त्यांनी, दोन पत्रे अमित शहांना लिहिली असून, त्यातले एक पत्र सचिन वाझेने एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिलेले पत्र आहे, त्याची सीबीआय चौकशी लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे, तर दुसरे जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्री घोटाळ्यावर लिहिले असून, मातीमोल दराने विकलेल्या अनेक कारखान्यांची ईडीद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारची पाठराखण करण्यासाठी चमचेगिरी करू नका; सुधीर मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांवर भडकले
दरम्यान, याबाबत अधिक बोलताना त्यांनी, “गडकरींजींनी जे कारखाने घेतले आहेत, त्याबद्दल त्यांनीच याचिका दाखल केली आहे. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. त्यांनी घेतलेले साखर कारखाने हे लोकाग्रहास्तव घेतले आहेत. तसेच, ते बँकेने सांगितलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकत घेतलेले आहेत. ते स्वतः करायची असेल तर या सगळ्याची खुल्या मनाने चौकशी करा असे सांगतात. मी काही नवीन म्हटलेले नाही,” असे सांगितले आहे.
एमपीएससीवरुन सरकारवर हल्लाबोल; राम सातपुतेंना पोलिसांनी घेतले ताब्यात
तसेच, याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण देताना, “पाटलांनी पत्रात मूळ तक्रारीचा उल्लेख करत कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जेव्हा मूळ तक्रार झाली होती, तेव्हाच गडकरीजींनी ३ वेळा लिलाव झाला, तरीही कोणीच समोर आले नाही, असे बंद असलेले कारखाने लिलावात विकत घेतले असल्याचे स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे, त्यांनी कारखाने बंद पाडून कमी किंमतीत घेतलेले नाहीत. त्यामुळे, जी चौकशी करायची आहे ती करा, असं तेही म्हणाले आहेत,” असं म्हटलं आहे.
Read Also :
- पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार; सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना दोन दिवस पुरेशे
- शिवसेनेशी वैचारिक मतभेद, शत्रुत्व नाही, युतीचा निर्णय योग्य वेळी घेऊ; फडणवीसांचे सूचक विधान
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेला दांडी, रिकामी खुर्ची असलेल्या फोटो व्हायरल
- आम्ही जे पाच महिन्यात करुन दाखवल , ते या सरकारला अठरा महिन्यात का जमले नाही; फडणवीस यांची सवाल
- प्रथेला फाटा देत अधिवेशन पूर्वेसंध्येला मुख्यमंत्र्याने पत्रकार परिषद टाळली, राज्यात चर्चेला उधाण