मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मराठा-ओबीसी आरक्षण, MPSC परीक्षा-नियुक्त्या आणि मुलाखती, कोरोनाचे निर्बंध आणि हाताळणी अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरूनही भाजपने वेळोवेळी निशाणा साधला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ८ ऑगस्टच्या फेसबुक लाइव्हवरूनही भाजपने मुख्यमंत्र्यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, हेच त्यांचे धोरण आहे असे म्हटले आहे.
“लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
“सगळ केंद्राने कराव आणि केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारांची बिल काढणार- हेच धोरण” असं ट्विट करत महाराष्ट्र भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले आहे.
सगळ केंद्राने कराव आणि केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारांची बिल काढणार- हेच धोरण #फेसबुकवाईव्ह
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2021
मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न
“भाजपच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लसीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लशीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही? pic.twitter.com/m5R5KKjPtg
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2021
आमच्याकडे क्यूआर कोड, पास तपासण्याची यंत्रणा नाही; राज्य सरकारनेच ती उभारावी – रावसाहेब दानवे
“सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!, असे तसरे ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला.
सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला.
घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले.
अभिनंदन मुंबईकर!— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2021
मोदी सरकार आज दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार; मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार?
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ८ ऑगस्टला जनतेशी संवाद साधला. यावेळी, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरी लस घेऊन ज्यांना १४ दिवस झाले असतील; त्यांना १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल”, असे जाहीर केले. या मागणीसाठी अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. भाजपानेही सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी आंदोलन केले होते.
Read Also :
- “आता ट्रायलला पण भडकता की काय?” उपमुख्यमंत्र्यांनी लगावला भाजपला जोरदार टोला
- मोठी बातमी! १५ ऑगस्टपासून लसींचे २ डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना करता येणार लोकल प्रवास
- ‘‘कुणी विचारलं तर पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला सांगा’’, अजित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला
- मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
- भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?