मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची काय गरज आहे ? असा सवाल करीत भाजपवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. त्यावर भाजपने देखील आपल्या खुमासदार शैलीत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या शिवसेना आणि भाजप ट्विट वार चांगलचं चर्चेत आलं आहे.
त्यांच्यासोबत मतभेद जरूर आहेत, मात्र अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चुक, यांचा छडा लावा; राज ठाकरे
मुंबई तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करेल तो मर्द मराठा लचके तोडल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ते अहमदाबाद जी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्याचा उपयोग काय ? असा सवाल करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आरएसएसचं स्वांतत्र्य लढ्यात कुठेही दिसली नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी जो लढा सुरू होता. त्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यात देखील तुम्ही कुठे होता. ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
“नवनीत राणा या आधी बारमध्ये काम करत होत्या”
मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नांवर बोट ठेवत भाजपने ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्ही म्हणता अहमदाबादला बुलेट ट्रेनची गरज नाही. कारण; तिथे कोणी जात नाही. मग हैद्राबादला बुलेट ट्रेन का मागताय ? ओवेसी आणि तुमच्या नव्या रझाकार मित्रांना औरंगजेबच्या कबरीपर्यंत लवकर पोहचता यावं यासाठी का ? असा सवाल करीत भाजपने मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
“आजची सभा हि शंभर सभेंचा बाप, विरोधकांच्या पोटदुखीवर आजच्या सभेत उपचार होतील”
दरम्यान, महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यात यांचे बाप म्हणजे जनसंघ फुटला होता. त्यामुळे मुंबईचे जे काही लचके तोडण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध रहा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, आणि मराठी आमचा प्राण आहे. आमचे जुने फोटो तुमच्यासोबतचे व्हायरल होत आहेत. ते हिंदुत्व आम्ही आता सोडलं आहे. कारण त्याचा आता काही उपयोग नाही. गाढवासमोर वाचली गिता , कालचा गोंधळ बरा होता. असंही म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमच्यासोबत जी गाढवं होती, अगदी घोड्याच्या आवेशात. त्या गाढवाला लाथ मारून आम्ही बाहेर पडलो आहोत. अशीही टिका देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
Read also:
- “कोदंडाचा जोरदार टणत्कार, काळ्या टोपीवाल्या मेंदुना झिणझिण्या नक्कीच आल्या असतील”
- “रश्मी ठाकरे तुंरुगात जाणार”; नवनीत राणांचं सुचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
- सोशल मीडियावर भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? केतकी चितळेचा न्यायालयाला सवाल
- “तो स्वासचं फोटो आल्यानंतर दिल्लीतून पत्र आलं”; उद्धव ठाकरेंनी काढला सोमय्यांचा चिमटा
- अखेर केतकी चितळेला पोलिसांनी घेतलं ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी मानले पोलिसांचे आभार