मुंबई: मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. बुधवारी मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यासोबतच प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. नितेश राणे यांच्यावरही महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
हे पण वाचा: पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना क्लिन चीट; राठोड यांचं होणार पुनर्वसन?
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ज्या मुंबई महापालिकेची ओळख आहे, त्या मुंबई महापालिकेच्या २८८ प्रभागात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असावी? कोणत्या नेत्यांवर काय जबाबदारी? या संदर्भातील प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल हा आत्मविश्वास आपल्याला असल्याचे भातखळखर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
हे पण वाचा: आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले; राजकारणात कधीही दिखाऊपणा केला नाही – धनंजय मुंडे
या बैठकीला आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, गोपाळ शेट्टी आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा मतदार संघ निहाय नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील मुद्दे, संघटना मजबूत करणे या विषयावर चर्चा झाली. नितेश राणेंवर दक्षिण-मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली असून मराठी आणि मुंबईतील कोकणी मतदारांची जबाबदारी देण्यात आली आहे.