पुणे : राज्यघटना मान्य नसेल तर पाण्यात बुडवा, असे वादग्रस्त वक्तव्य पुणे महापालिकेचे भाजपचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केले आहे. त्यामुळे सर्वत्र स्तरातून सभागृह नेते गणेश बीडकर यांनी देवता समान असलेल्या संविधानाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पुण्यातील विविध संघटनांनी केली आहे.
हे पण वाचा : फडणवीस सरकारची चुक अजितदादांनी निस्सारली, २३ गावांच्या निर्णयाचे स्वागतच – प्रशांत जगताप
देवता समान असलेल्या शिवाय अवघा राष्ट्र ज्या राज्य घटनेच्या आधारावर चालते, सर्वसामान्यांच्या जगण्याचा, न्यायाचा आधार असलेल्या राज्य घटनेबद्दल असे वक्तव्य करताना बीडकरांना लाज वाटली नाही का?, बीडकरांना सत्तेची मस्ती चढली आहे का?, असे प्रश्न आता जनता विचारू लागली आहे. राज्य घटनेचा अवमान करणाऱ्या बीडकरांचा तात्काळ राजीनामा घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
२३ गावांच्या विकास आराखड्याला दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली. त्यानंतर एका डिजीटल माध्यमांनी २३ गावांचा विकास आराखडा की आखाडा?, या विषयावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप आणि भाजपचे नगरसेवक तथा सभागृह नेते गणेश बीडकर यांना आमंत्रित केले होते. २३ गावांच्या विकास आराखड्यावर स्पष्टिकरण देतावेळी गणेश बीडकर यांनी चक्क राज्यघटना मान्य नसेल तर ती समुद्रात बुडवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी निषेध नोंदवून गणेश बीडकर यांनी जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली.
बीडकरांनी दिलगिरी व्यक्त करावी – प्रशांत जगताप
राज्य घटनेचा समर्थक म्हणून मी सर्वप्रथम या वक्तव्याचा निषेध करतो. देवता समान राज्य घटनेचा अवमान करणे दे दुर्देवी आहे. मी डिजीटल मिडीयाशी चर्चा करत असतानाही निषेध नोंदवला होता. त्यांनी जनतेसमोर येवून दिलगिरी व्यक्त करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ईश्वरा समान आहे. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षानी अवमान करू नये. त्यामुळे गणेश बीडकरांना जनतेसमोर येवून दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.
गणेश बीडकरांकडून दिलगिरी व्यक्त
एका डिजीटल माध्यमावरी चर्चेत बोलताना ‘घटना समुद्रात बुडवा’ हे वक्तव्य संदर्भासहित ऐकावे. यावर माझी भूमिका मांडण्यापूर्वी मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या मूळ मुद्द्याला उत्तर देतां येत नसल्याने माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जाते आहे. माझ्या एखाद्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न मी कधीही यशस्वी होउ देणार नाही. तरीही माझ्या तोंडून अनावधानाने चुकीचे शब्द गेले असल्यास मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टिकरत भाजपचे गणेश बीडकर यांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.
कारवाईच्या मागणीसाठी संघटना एकवटल्या
गणेश बीडकर यांनी घटनेचा अवमाने केला आहे. त्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शहरातील विविध संघटना करू लागल्या आहेत. त्यामुळे गणेश बीडकर राजीनामा देणार का?, त्यांच्यावर कारवाई होणार का?, राजीनामा दिल्यास अथवा कारवाई झाल्यास गणेश बीडकरांना मोठ्या संकटांना समोरे जावे लागणार आहे. शिवाय त्यांचे राजकिय करीअर देखिल धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजीनाम्याच्या मागणीमुळे गणेश बीडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे बीडकरांवर कारवाई होणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- “हे निगरगट्ट सरकार लोकशाहीला घातक, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही”
- “ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
- आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला महापालिका निवणुकीत जागा दाखवून देवू – नाना पटोले
- गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
- अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला