औरंगाबाद : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबाद येथे जल अक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. तसेच या मोर्चात केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे तसेच इतर भाजपचे पदाधिकारी देखील सामील होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार टिका केली.
इडा पिडा टळो, अन् इडीचा ससेमिरा मरो; भावना गवळी यांच्यासाठी शिवसेनेकडून यज्ञ
संभाजीनगरच्या लोकांना फक्त शिवसेनेने आश्वासन दिली आहेत. त्यांनी फक्त भावनेचं राजकारण केलं मात्र ते संभाजीनगरला थेंबभर पाणी ते देऊ शकले नाहीत. तसेच आमच्या सरकारच्या काळात आम्ही 1600 कोटी रूपयांची योजना जाहीर केली होती. त्याही योजनेत 600 कोटी रूपये महापालिकेने मागितले. अर्धालिटचं काम देखील झालं नाही असंही ते म्हणाले.
“बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात
संभाजी नगरमध्ये जो काही लोकांचा आक्रोश आहे. त्याचा सामना राज्य सरकारला करावाच लागेल आणि संभाजीनगरला पाणी मिळल्याशिवाय आमचं जलआक्रोश संपणार नाही. महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार द्यायालाही पैसा इकडे वळवला. त्या योजनेचे ठेकेदार काम करत नाही. अर्धा किमी कामही झालेलं नाही. 40 किमी काम करायचं आहे. 20 वर्ष लागतील अशा स्पीडने काम सुरू आहे. असंही ते म्हणाले.
“कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, मग तो कुणीही असो”; राऊतांनी संभाजी राजेंना स्पष्ट सांगितले
दरम्यान, शिवसेना मागील 30 वर्षापासून औरंगाबादच्या लोकांना वेडं बनवत आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्यांनी दरवर्षी फक्त पाच-पाच टाक्या जरी बांधल्या असत्या तरी पाणी प्रश्न इतका गंभीर झाला नसता. यांनी फक्त हिंदु-मुस्लिम आणि मंदिर-मशिद एवढ्याच मुद्दयावर राजकारण केलं. पाण्याच्या प्रश्नासाठी मी औरंगाबादच्या जनतेलाही जबाबदार धरतो. कारण जनतेनं कधीही पाण्यासाठी मतदान केलं नाही. शहरातील लोकांनी फक्त हिंदुत्वासाठी मतदान केलं. पाण्यासाठी मतदान केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. असं जलील म्हणाले.
Read also:
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
- “सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस
- राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ?