मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी प्रश्नांवरून खिंडीत गाठण्याचा प्रयत्नात असलेल्या आणि त्यासाठी शहरात येऊन जल आक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपचे दबाव तंत्र अखेर कामाला आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जल आक्रोश मोर्चातील आक्रोश सभेच्या पार्शवभूमीवर का होईना पण, मुख्यमंत्र्यांना अखेर ऐकू गेला. आज मुंबईत खास औंरगाबादेतील पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे.
“चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थितीत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
“मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले
“दिवसरात्र केवळ मीच कार्य करतो, असं नाही तर 130 कोटींचा हातभार लागतो” ; नरेंद्र मोदी
ते म्हणाले, “औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल.”
या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अशी मुखयमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.
“तुमच्या आमदाराने याठिकाणी खुप चांगलं काम केलंय”; शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक
दरम्यान येत्या ८ जून रोजी औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या पार्शवभूमीवर मुख्यमंत्र्यांचे औरंगाबादच्या पाणी प्रशांकडे लक्ष गेले का? असा सवाल होत आहे. सध्या शहरातील पाणी प्रश्नावर तोडगा काढून त्याची घोषणा सभेतून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप-सेनेचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी १६८० कोटींची पाणी योजना मंजुर केली होती. कालांतराने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि या योजनेत बदल करण्यात आले.
राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
ज्या फडणवीसांनी पाण्यासाठी योजना मंजुर केली होती, त्यांनीच या प्रश्नावरून शिवसेनेला धारेवर धरत २३ मे रोजी शहरात जल आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाचा परिणाम म्हणा, की मग शिवसेनेकडून पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने म्हणा अथवा ८ जून रोजी होणाऱ्या सभेचे पडसाद म्हणा पण या विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्वंतत्र बैठक बोलावली आणि तोडगा काढायला सांगितला हे महत्वाचे. त्यामुळे आता तरी औंरगाबादकरांना नियमित पाणी मिळते का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- “राज्यसभेच्या निवडणुकीसारखं, विधान परिषदेच्या निवडणुकीतही ‘भाजप’ आघाडीला रडवणार”
- भाजपचे महाडिक विजयी होणार, आणि महाविकासआघाडीचा बडा नेता घरी बसणार
- राज्यसभा निवडणूकिसाठी फडणवीसांची मोर्चेबांधणी, अपक्ष आमदरांना गळाला लावणार?
- राज्यसभा निवडणुक; नवाब मलिक, अनिल देशमुखांसाठी अजित पवार न्यायालयात जाणार ?
- “संभाजीनगरच्या”टोमणे सभेत”ढोंगी हिंदुत्ववादी उत्तर देणार का?” सभेआधी मुख्यमंत्र्यांना मनसेने डिवचलं